भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर होताच शरद पवार यांची घेतली भेट

भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे  (बाळ्या मामा) यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मध्ये आनंदोत्सव साजरा केला जात  आहे.दरम्यान आज शुक्रवारी सकाळी सुरेश म्हात्रे यांनी पुणे येथे जाऊन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादी पक्षाचे नेते आमदार रोहित […]

Continue Reading

मैत्रीपूर्ण लढत देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरणार – दयानंद चोरघे

भिवंडीत राष्ट्रवादीवर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते नाराज. भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार संघ आहे या मतदारसंघातून नऊ वेळा काँग्रेस पक्षाचा खासदार झाला आहे.त्यामुळे या मतदार संघावर काँग्रेस पक्षाचा हक्क असून पक्षाला प्रस्ताव देऊन त्यांच्या निर्देशानुसार भिवंडी  लोकसभा मतदार संघातून मैत्रीपूर्ण निवडणूक लढवली जाईल अशी माहिती काँग्रेस पक्षाचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष […]

Continue Reading

भिवंडीतील मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपात..केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केले स्वागत.

भिवंडी  (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाला वाढता प्रतिसाद मिळत असून केंद्रीयमंत्री व भाजपासह महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा उबाठा गट व मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत करीत कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदार संघात ५१ टक्के मते मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला.भिवंडी तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीतील उबाठा […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा जागेचा तिढा कायम, राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा केल्याने काँग्रेस पक्षात खळबळ,

दयानंद चोरघे व सुरेश म्हात्रे मध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघावर शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केल्यामुळे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी तीव्र नाराज झाले असून इच्छुक उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे.भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार संघ आहे त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी […]

Continue Reading

श्रमजीवी संघटनेचा भिवंडीत एक हाती हंडा..एक हाती दांडा मोर्चाचे आयोजन..

भिवंडी ( प्रतिनिधी ) तीव्र उन्हाळा चे झळा वाढू लागल्या असुन त्यामुळे शहर व ग्रामीण भागात पाणी टंचाई समस्या गंभीर बनत आहे. भिवंडी तालुक्यातील काही गावात आदिवासी पाड्यांवर पाणी उपलब्ध होत नसल्याने महिला व नागरिकांची मुबलक पाणी मिळवण्यासाठी फरफट होत आहे.याबाबत तक्रारी करून सुध्दा शासकीय यंत्रणा दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थ नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून […]

Continue Reading

टोरंट पावर कंपनीचेवतीने भिवंडीत
“दावत ए इफ्तार “

भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी शहर परिसरात वीज पुरवठा  करणाऱ्या टोरंट पावर कंपनीचेवतीने सामाजिक एकता भाईचारा कायम असावा या भुमिकेतून रमजान महिना निमित्त मुस्लिम बांधवांसाठी  दावत ए ” इफ्तार ” हा कार्यक्रम भिवंडी शहरातील अंजूरफाटा येथील बालाजी सभागृहात आयोजित केला होता.या वेळी हिंदू व मुस्लिम बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन पवित्र रमजान महिण्याचे उपस्थित बांधवाना शुभेच्छा व्यक्त […]

Continue Reading

भिवंडीत दोन गटात झालेल्या भिषण
हाणामारीत एकाच मृत्यू..

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील कामगार वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्याशांतीनगर भागातील केजीएन  चौकाच्या बाजूला चाळीत पूर्व वैमान्यासातून रक्तरंजित झालेल्या दोन गटातील हाणामारीत झालेल्या चाकू हल्ल्यात एक जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले आहेत.या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.जुबेर शोएब शेख (४८) असे मयताचे नाव असून […]

Continue Reading

भिवंडी भाजपा उमेदवार कपिल पाटील यांनी घेतली ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट.

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीचे रिंगणात असलेले भाजपा उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी,पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार सुरू केला आहे. असे असतानाच त्यांनी ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण समर्थ बैठक परिवाराचे प्रेरणास्रोत श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी यांची अलिबाग रेवदंडा येथील निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेऊन त्यांची आस्थेने […]

Continue Reading

पाणी टंचाई मुळे त्रस्त महिलांनी
श्रमजीवी संघटनेचे नेतृत्वाखाली भिवंडीतील  दहा ग्रामपंचायतीवर धडक आंदोलन केले.

भिवंडी ( प्रतिनिधी ) उन्हाचा तडाखा वाढू लागला तसा पाणी टंचाई चा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे.राज्य शासन व ठाणे जिल्हाधिकारी यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना पाणी टंचाई संदर्भात तातडीने सव्हेँ करून नागरिकांना मदत करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र भिवंडी तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांनी या आदेशाने तिलांजली दिल्यामुळे विविध ग्राम पंचायत हद्दीत पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे […]

Continue Reading

पाणी टंचाई बाबत नियोजन करा – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांचे अधिकाऱ्यांना  कठोर निर्देश

                                                                        ठाणे – तीव्र उन्हाळ्यामुळे येणाऱ्या नजीकच्या काळात जिल्ह्यात पाणीपुरवठा विषयी व्यवस्थित नियोजन करणे आवश्यक आहे त्यानुषंगाने पाणीटंचाई उपाययोजनासंबंधी यंत्रणांनी काटेकोर नियोजनाच्या तयारीला आतापासूनच लागा, असे निर्देश कठोर शब्दात ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी शहापूर येथे आयोजित पाणी टंचाई उपाययोजना आढावा  बैठकीत दिले. यावेळी ठाणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती छायादेवी शिसोदे, भिवंडी उपविभागीय […]

Continue Reading